Ads

तीळ काढतं असताना मळणी यंत्रात ओढल्याने शेतमजुराचा मृत्यू

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-शेतात तीळ मळणी सुरू असताना मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने एका ६० वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला ही दुर्देवी घटना रविवार २६ मे रोजी दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा घाटंजी शेत शिवारात बळवंत पालतेवार यांच्या शेतात तीळ मळणीचे काम सुरू होते. मळणी यंत्राची जोडणी करण्यात आली. दरम्यान, या यंत्रात तीळ लोटत असताना मृतक पांडुरंग अंबादास गिनगुले वय ६० रा. घाटी या शेतमजुराचा हात ओढल्या गेल्याने त्याचे संपूर्ण शरीर मळणी यंत्रात अडकले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी विलास पांडुरंग गीनगुले यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
तेव्हा घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गद्शनाखाली पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment