चंद्रपूर :- चंद्रपुर मधील सावली तालुक्यातील बेलगाव येथील सरपंच अंबादास पाल यांचा विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंबादास शेतात कामासाठी गेले असता आज सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे मृत्यू Sarpanch dies due to electric shock
बेलगाव येथील शेतकरी तथा सरपंच अंबादास पाल हे नेहमीप्रमाणे आज सकाळी आपल्या शेतात धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतात विद्युत प्रवाह सुरू असलेली तार जमिनीवर पडून होती. या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पाथरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कार्यवाही केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अंबादास पाल यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे
0 comments:
Post a Comment