अकोला प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजना या योजने अंतर्गत शहरी भागामध्ये व ग्रामीण भागामध्ये जे अनुदान देण्यात येते. त्या अनुदामध्ये तफावत असुन ज्या प्रमाणे शहरी भागामध्ये घराचे बांधकाम करण्यासाठी खर्च येतो.
त्याही पेक्षा ग्रामीण भागातील घरांकरीता जास्त खर्च येतो. त्याचे कारण सिमेंट लोहा गिट्टी व ईतर साहीत्य शहराच्या ठिकाणी उपलध्द असते परंतु तेच साहीत्य ग्रामीण भागातील नागरीकांना शहरातुन आनावे लागते. त्याचा वाहतुक खर्च जास्त येतो.व महागाई वाढली आहे. व गरजूंना तात्काळ घरकुल देण्यात यावे व ज्याचे नाव पात्र यादी मध्ये मागें आहे व ज्यांना आवश्यकता आहे. त्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे..
शहरी व ग्रामीण भागातील पात्र लाभार्थीयांणा मिळणारे अनुदान समसमान द्यावे अशी मागणी पुर्णाजी निरंजन खोडके पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे ईमेल द्वारे केली आहे....
0 comments:
Post a Comment