(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- शहरातील मुख्य रस्त्या शिवाजी चौकातील दोन ते तीन लाईट नादुरुस्त असल्यामुळे लाईट दुरुस्ती करण्यात यावे. असे अनेकदा संबंधित विभागाला तसेच अधिकाऱ्याला नागरिकांनी सांगितले आहे .पण याकडे सर्रास ते दुर्लक्ष करीत आहेत.शहरातील मुख्य रस्त्यावरील लाईट नादुरुस्त असल्यामुळे चालू बंद अवस्थेत होत आहेत.
या बंद असलेल्या लाईट मुळे चौकात अंधार पसरलेला आहेत तसेच छोटे-मोठे अपघात या अंधारामुळे होत आहेत. कालच एक अपघात झाला होता.
या बंद असलेल्या लाईट मुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत . शहरातील नागरिक संबंधित विभाग व अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता संबंधित विभागाने तात्काळ आणि त्वरित लक्ष द्यावे. शिवाजी चौकात बंद असलेले पथदिवे सुरु न केल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या घरासमोरील पथदिवे बंद करण्यात येईल असा ईशारा शिवसेना सिंदेवाही तालुका अध्यक्ष राकेशभाऊ अलोने यांनी दिला आहे.
0 comments:
Post a Comment