Ads

चंद्रपूर शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० वर उड्डाणपूल बांधा - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-चंद्रपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० हा शहराच्या आतून जाणारा असून हा महामार्ग चंद्रपूर ते बल्लारशाह व चंद्रपूर ते गडचिरोली या महत्वपूर्ण शहरांना जोडतो. चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथील लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. परिणामी शहर विस्तारित होत असून महामार्गाला लागून बर्याच वसाहती निर्माण झाल्या आहे. तसेच चंद्रपूरात साकार होत असलेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय याच महामार्गावर आहे.
त्यामुळे ह्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. परिणामी या महामार्गावर अपघात होण्याची संख्याही वाढली आहे.
त्यामुळे यावर तोडगा म्हणून येथील वरोरा नाका उड्डाणपूल ते सावरकर चौक, सावरकर चौक ते बंगाली कॅंम्प जवळ असलेल्या आर. ओ. बी. (एम.ई.एल)ला जाणार्या रेल्वे लाईन पर्यंत उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. नितीन गडकरी यांना केली आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यास चंद्रपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० वरील जड वाहतूक कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल असेही सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment